Showing posts with label Marathi Books. Show all posts
Showing posts with label Marathi Books. Show all posts

Tuesday, 31 January 2023

पुस्तक - व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची / लेखक: डॉ गिरीश आफळे

"व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची"

"गांधीजी - नेहरू ने हम पठानोंका प्रदेश पाकिस्तान को तश्तरी में डाल के दे दिया और हमें इन चील कौव्वों सामने( पाकिस्तान मध्ये)मरने के लिए छोड़ दिया." - खान अब्दुल गफार खान

पुस्तक: व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची

लेखक: डॉ गिरीश आफळे

प्रस्तावना: प्रशांत पोळ

पृष्ठ:४८८

मूल्य:६००/



खैबर पख्तूनख्वा  हा प्रांत सरहद्द गांधी  म्हणून ओळखल्या गेलेल्या खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वात भारतात राहू इच्छित असताना नेहरूंनी मात्र तो पाकिस्तान ला भेट स्वरूपात दिल्या सारखा दिला...तेथील लोकांची इच्छा नसताना.तेथील प्रांतिक कायदेमंडळ हे मुस्लिम लीग चे नव्हते...ते काँग्रेसचे होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी लोकसंख्येच्या आदलाबदलीची मांडणी केली होती.परंतु काँग्रेस ने ही अदलाबदली धुडकावून लावली. जीना देखील लोकसंख्येच्या आदलाबदलीसाठी आग्रही असताना काँग्रेसने ही भयंकर चूक केली होती...ज्या काँग्रेस ला मुस्लिम मतदार संघात घोर पराभव झालेला होता.मुस्लिमांनी नाकारले होते....

जगातील सर्वात मोठ्या विस्थापनाच्या आणि हिंसाचाराच्या काळात काँग्रेस ने काय केलं?भारतात जीव मुठीत घेऊन पाळणाऱ्या हिंदू आणि शिखंच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी काही केले का? का आलेल्या बेघर निर्वासितांची काही सोय काँग्रेसने लावली? त्यांना अन्न, पाणी देऊ केले का?त्यांच्या निवाऱ्याची सोय केली? 
या प्रश्नांचे उत्तर शोधूनही "हो" असे सापडत नाही.प्रचंड मोठी असहकार आणि चलेजावची मोहीम राबवणाऱ्या काँग्रेसकडे आता मात्र माणसं नव्हती.

भारताची फाळणी अतिशय वेदनादायी होती. साधारणता पाच ते दहा लाख हिंदूं आणि शिखांना या फाळणीच्या दंगलीमध्ये फुटीर अतिरेक्यांनी मारले. बाटवले सर्वस्व लुटले. सुमारे दीड कोटी हिंदूंना आपलं सर्वस्व सोडून आपल्याच देशात परागंदा व्हावे लागले. हिंदुस्तानची फाळणी ही हिंदूंच्या वंश विच्छेदाची सर्वात मोठी घटना! फाळणी खरंच अटळ होती का?
या संदर्भात आपल्याला अनेक असे मुद्दे आपल्याला सुन्न करून सोडतात....

हा ग्रंथ भारताच्या फाळणी पर्यंत न थांबता पुढं काश्मीर युद्ध आणि महात्मा गांधींची हत्या या भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांना ही समाविष्ट करते..

या पुस्तकातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! 
५०० हून  अधिक स्वयंसेवकांनी  स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन हिंदूंना सुखरूप भारतात पोहोचवले.त्या स्वयंसेवकांचे बलिदान कसं झाले, त्यांचे प्रयत्न आणि त्यांची पराकाष्ठा सर्व या पुस्तकात वाचायला मिळते.त्यांची नावे, गावे तपशीलवार वाचायला मिळते.शेवटचे प्रकरण नेहरू, पटेल  आणि संघावर आहे.पंडित नेहरू यांचा पूर्वग्रदूषित संघाबाबतचा दृष्टिकोन ,काश्मीर प्रश्नात संघाचे योगदान या साठी तर हे पुस्तक अधिक उपयुक्त ठरते.

प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचून विचार केला पाहिजे...

हिंदुस्थानच्या फाळणीची सखोल पार्श्वभूमीसह ,तपशीलवार अभ्यास करून मांडणी केलेला ग्रंथ ,जितका व्यापक तितकाच संदर्भ.! लेखकाचा स्वभावच'अभ्यासोनि प्रकटावे' असा आहे.त्याचा अनुभव या ग्रंथात पानोपानी येतो. 
५० पृष्टांचे परिशिष्ट आणि संदर्भ ग्रंथ सूची आहे.
हा ग्रंथ २६ प्रकरणे आणि ४७५ उपप्रकरणे किंवा बिंदुंच्या माध्यमातून साकारला आहे.
प्रत्येक मुद्द्याला शीर्षक दिलेले आहे.या सर्व मुद्द्यांचा अनुक्रमणिका(२० पेज) मध्ये समवेश केल्यामुळे नेमका संदर्भ हवा तेंव्हा शोधने सुकर झालेले आहे.

संदर्भ आणि नोंदी अधिक असतील तर अनेक वेळा ग्रंथ बोजड होतो.वाचनाला गती येत नाही.पण हा ग्रंथ अतिशय प्रवाही आणि प्रभावी आहे.सोपी आणि तरल अशी भाषा आहे.क्लिष्टता अजिबात नाही.त्यामुळं फाळणीचा इतिहास,पार्श्वभूमी आणि परिणाम सर्व एकत्र वाचायला मिळते आणि ते वाचावेसे वाटते.

अधोरेखित करायचे ठरले तर सगळं पुस्तकच अधोरेखित होईल,इतकी माहिती आपल्याला यात वाचायला मिळते.अनेक पत्र जे आपल्याला थक्क करून सोडतात.

"निजामाचे राज्य हे शंभर टक्के स्वदेशी...." - महात्मा गांधी "..... मला विचाराल, तर ब्रिटिश किंवा इतर कोणाही परकीय सत्तेच्या सुव्यवस्थेत राजवटीपेक्षा मी अराजकच अधिक पसंत करेल. इतर संस्थानिकांना मांडालिक बनवून किंवा सरहद्दीवरील मुसलमान टोळ्यांची मदत घेऊन निजाम भारताच्या गादीवर बसला, तर त्याला मी निश्चित मी निःसंदिग्ध संमती देईल. निजामाचे राज्य हे शंभर टक्के स्वदेशी राज्य आहे असे मी मानतो...

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे ...