Showing posts with label Books Review. Show all posts
Showing posts with label Books Review. Show all posts

Saturday, 29 April 2023

स्मृतिचित्रे /लेखक -लक्ष्मीबाई टिळक


               स्मृतिचित्रे.                  


लेखन: लक्ष्मीबाई टिळक
पहिली आवृत्ती:१९३४
सातवी आवृत्ती: २०१८(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पृष्ठ:४५८ मूल्य:४००/

मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. 
प्रसिद्ध समिक्षक माधव मनोहर म्हणतात की ' हा ज्ञानेश्वरीजवळ ठेवावा असा ग्रंथ आहे.' 
स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. 
या काळातील सामाजिक बदलांचेही चित्रण यात आढळेल. 
यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. 
अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल. 
हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईंचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे. या रम्यतेचे, अद्भुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते. 
आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. 
दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते. आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईंची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. 
इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. 
यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. 
प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल.

Sunday, 19 March 2023

पुस्तक:"पाकिस्तान अथवाभारताची फाळणी" लेखक: डाॅ. बी. आर. आंबेडकर

पुस्तक:"पाकिस्तान अथवा भारताची फाळणी"
लेखक: डाॅ. बी. आर. आंबेडकर

  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1940 ला हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दृष्टा महापुरुष! तसेच ते अत्यंतिक राष्ट्रभक्त! त्यांनी आपले विचार भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मांडले.विरोध पत्करून कृती केली.जेंव्हा पाकिस्तान ची मागणी जोर धरत होती तेंव्हा हे  पुस्तक लिहिले.

 तत्कालीन परिस्थिती मुसलमान समाजाची मानसिकता , त्यांचा इतिहास , समाजातील स्त्रियांची स्थिती यावर परखड मत बाबासाहेब यांनी व्यक्त केले आहे . 

पृष्ठ:३३६ हार्ड कव्हर

मूल्य:४००
 
अनुक्रमणिका

● प्रस्तावना

भाग पहिला : पाकिस्तानकरता मुस्लिम जनतेची स्थिती.!

•भाग दुसरा : पाकिस्तानविरुध्द हिंदूंची विचारधारा

•भाग तिसरा : पाकिस्तानचा पर्याय.?

•भाग चौथा : पाकिस्तान ची संवेदना

•भाग पाचवा : पाकिस्तानच्या समस्या

•पुस्तक कसे आहे.? त्यातील एक पृष्ठ

लाला लजपतराय

लाला लजपतरायांनी सी.आर.दास यांना लिहिलेल्या पत्रात पुढील भीतीचा उल्लेख केलेला आढळतो...

 'दिवसापासून मला एका गोष्टीचे शल्य डिवचत आहे , त्यावर आपण जास्तीतजास्त सावधनपूर्वक विचार करू शकाल अशी मला आशा आहे . मी सहा महिनीच्यावर काळ मुस्लिम इतिहास आणि मुस्लिम कायद्याच्या अध्ययनात घालविला .त्यावरून हिंदू-मुस्लिम ऐक्य हे अशक्य व प्रयोगात आणण्यासारखे नाही अशी माझी स्पष्ट धारणा झालेली आहे ."

पुस्तकावर काही अधिक लिहिण्यापेक्षा हे पुस्तक वाचणे हेच चांगले.


पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे ...