Saturday, 29 April 2023

स्मृतिचित्रे /लेखक -लक्ष्मीबाई टिळक


               स्मृतिचित्रे.                  


लेखन: लक्ष्मीबाई टिळक
पहिली आवृत्ती:१९३४
सातवी आवृत्ती: २०१८(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पृष्ठ:४५८ मूल्य:४००/

मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. 
प्रसिद्ध समिक्षक माधव मनोहर म्हणतात की ' हा ज्ञानेश्वरीजवळ ठेवावा असा ग्रंथ आहे.' 
स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. 
या काळातील सामाजिक बदलांचेही चित्रण यात आढळेल. 
यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. 
अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल. 
हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईंचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे. या रम्यतेचे, अद्भुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते. 
आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. 
दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते. आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईंची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. 
इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. 
यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. 
प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल.

Friday, 14 April 2023

आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे


आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे

सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील या  तीन मराठी स्त्रिया ज्यांनी येथील सामाजिक स्थित्यंतर स्वतः पासून सुरू केलं..! 
आपल्या इच्छा शक्तीने,जिद्दीने समाज  आणि स्वतःच्या अप्त स्वकियांचा विरोध सहन करून त्या शिकल्या.ज्या काळात मुलींना शिक्षण हे पाप मानल गेलं

लेखिका: श्रीमती रमाबाई रानडे
पहिली आवृत्ती: १९१०
पाचवी आवृत्ती: २०१७(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पृष्ठ:२७२ मूल्य:३००/
या पुस्तकबाबत गोपाळ कृष्ण गोखले लिहितात,

"महाराष्ट्राचे मोठे भाग्य,हा ग्रंथ लिहिण्याचे श्री. वहिनीबाईंनी मनात आणले व हाती घेतलेले काम तडीसही नेले, हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य समजले पाहिजे. पत्नीने आपल्या पतीबद्दल अशा तऱ्हेने लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ हिंदुस्थानात आहे असे वाटते, व तो वहिनीबाईंनी लिहिला हे फार योग्य झाले. कारण, हल्लींच्या काळात आपल्या इकडील स्त्रियांत श्री. वहिनीबाईंची योग्यता फार मोठी आहे. आपल्या वयाची सत्तीवीस वर्षे ज्यांनी त्या विभूतीबरोबर त्यांची सहधर्मचारिणी या नात्याने 'सावली' प्रमाणे घालविली, ज्यांच्या अंगचे नैसर्गिक तेज शिक्षणाने व अतिथोर सहवासाने अनेक पटींनी वृद्धिंगत झाले, व ज्यांचे मन रावसाहेबांच्या भक्तींत कायमचे गढ़ून राहिले आहे, त्यांनी आपल्य दिगंतकीर्ती पतीच्या स्वभावाचे व आयुष्यक्रमाचे काढलेले चित्र आपणास पाहावयास मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील लोकांस अभिमान व समाधान वाटणे साहजिक आहे."

"स्त्रियांच्या मनोधर्माचे मोहक रूप:हे पुस्तक वाचणाराचे मनावर ज्या कित्येक गोष्टींचा विशेष ठसा उमटल्याशिवाय राहाणार नाही, त्यापैकी एकदोहोंचा येथे उल्लेख करणे जरूर वाटते. पाश्चिमात्य समाजात पुष्कळ कुटुंबांत पतिपत्नींमध्ये पराकाष्ठेचे प्रेम आढळते, पण त्यांचा परस्परभाव बहुतेक बरोबरीचा असतो; पण तशा तऱ्हेचेच प्रेम उभयतांमध्ये असता पत्नीने पतीच्या सेवेस आपणास सर्वस्वी वाहून घेऊन त्यातच धन्यता मानावी, हा पूर्वेकडील स्त्रियांचा व त्यातही हिंदुस्थानातील स्त्रियांचा विशेष मनोधर्म आहे.
हा मनोधर्म हजारो वर्षांच्या संस्कराचे व परंपरेचे फल आहे व त्याचे अत्यंत मोहक स्वरूप या पुस्तकात दिसून येत आहे. 
नवे शिक्षण, नव्या कल्पना व नवी परिस्थिती यांनी विचारास व आयुष्यक्रमास नवे वळण लागले असताही वहिनीबाईंसारख्या स्त्रियांचा हा मनोधर्म आहे तसाच कायम राहातो, यापासून पुष्कळ बोध घेता येण्यासारखा आहे."

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे ...