Friday, 31 March 2023

डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र /लेखिका -काशीबाई कानिटकर


सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील या  तीन मराठी स्त्रिया ज्यांनी येथील सामाजिक स्थित्यंतर स्वतः पासून सुरू केलं..! 
आपल्या इच्छा शक्तीने,जिद्दीने समाज  आणि स्वतःच्या अप्त स्वकियांचा विरोध सहन करून त्या शिकल्या.ज्या काळात मुलींना शिक्षण हे पाप मानल गेलं.

आपल्या नवऱ्याच्या भरभक्कम साथीने त्या घरातील आणि समाजातील निंदा नालस्ती ला पुरून उरल्या.स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा कायमचा उठवला


डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र
लेखिका:काशीबाई कानिटकर
दुसरी आवृत्ती:१९१२
चौथी आवृत्ती:२०१९(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पेज:३२८ मूल्य:३५०/

ज्या काळात भारतीय स्त्रीला शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं, त्या काळात एक  सतरा स्त्री एकटीच परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेते ही क्रांतिकारकच म्हणावी अशी घटना होती. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशींचं नाव आज आपण अतीव आदराने घेतो.

या उच्चविद्याविभूषित स्त्रीचं चरित्र त्यांच्या मृत्यनंतर काशीबाई कानिटकर यांनी लिहिलं. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर म्हणून त्यांचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे आणि ते तेवढ्याच तोलाच्या स्त्रीने लिहिलं पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. या संदर्भात काशीबाई लिहितात, 
“सौ. डॉ. आनंदीबाईंचे चरित्र लिहिण्यास त्यांच्या तोलाचेच मनुष्य पाहिजे होते, व ही इच्छा माझ्या एका विद्वान मैत्रिणीजवळ मी एके प्रसंगी व्यक्त केली होती; परंतु कार्यबाहुल्यामुळे तिने नन्नाच्या पाढ्यासारखेच उत्तर दिले. झाले काम तर तेथेच होईल अशी माझी अशा होती, ती निष्फळ झाल्यासारखी मला वाटली. 
कारण त्या एका मैत्रिणीशिवाय पुस्तक लिहिण्यासारखी विद्वान स्त्री माझ्या ओळखीची व योग्य अशी दुसरी आढळण्यास नाही. 
तेव्हा मला असा विचार पडला की, आता कोणाला विचारावे! शेवटी काहीच जमेना, तेव्हा हे काम वेडेवाकडे आपणच करून टाकावे, असा मी निश्चय केला.” काशीताईंना जरी हे ‘वेडेवाकडे’ वाटत असले तरी या चरित्राची दाखल तत्कालीन विविध नियतकालिकांनी घेतलेली दिसते. 
काहींनी त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं असलं तरी काहींनी प्रखर टीकाही केली. मात्र या लेखनामुळेच आनंदीबाईंचं तपशीलवार चरित्र पुढील पिढ्यांना उपलब्ध होऊ शकलं, हे या पुस्तकाचं मोठं योगदान आहे. 
अवघ्या दहा दिवसांचं मूल उपचाराअभावी दगावलं तेव्हा त्या दुःखातून सावरताना आनंदीबाईंनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला आणि वयाच्या सतराव्या वर्षी एकट्याने अमेरिकेला जाऊन आपलं वैद्यकीय शिक्षण घेतलं. 
अनेक आपत्तींना तोंड देत त्यांनी शिक्षण कसं पूर्ण केलं ते काशीबाईंनी आपल्या पुस्तकात अगदी मनःपूर्वक लिहिलं आहे.
याबरोबरच आनंदीबाईंच्या पती गोपाळराव यांचं चरित्रही त्यांनी रेखाटलं आहे.

Thursday, 30 March 2023

इकिगाई :जगायला उमेद देणारा एक जादूई कुंभ

इकिगाई :जगायला उमेद देणारा एक जादूई कुंभ

जगभर ज्या पुस्तकाची सातत्याने वाढती चर्चा आणि वाचन चालू असते ते म्हणजे इकिगाई!

तुम्हाला जेंव्हा केंव्हा थोडंसं ही बोर होऊ लागलं किंवा रिकामे वाटायला लागलं की हे पुस्तक काढावे आणि पुन्हा वाचावे!

शरीर मन आणि बुद्धी सतत ताजे तवाने ठेवू शकतो आपण!

आज आपण तरुण आहोत.हाताला काम आहे.नाती गोती मित्र मैत्रीण आहेत.वेळच नाही पुस्तकं वाचायला.ठीक आहे नका वाचू भरपूर पुस्तकं...पण हे पुस्तक नक्की वाचा.उत्तर आयुष्यातील एकाकीपणाची कल्पना करून वाचावे....अख्खे जीवन सुखी जाईल!

हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायचे असल्याने हार्ड कव्हर असलेलेच विकत घ्यावे.भेट द्यावे.

हार्ड कव्हर पुस्तकाची किंमत:३९९/


प्रत्येक निवृत्त व्यक्तीस  कॉमन प्रश्न पडतात..?
•वेळ कसा  घालवायचा ?
•आपण वयस्कर झालोत का?
•आरोग्य साथ देईल का?
•घरात स्वतंत्र स्थान राहील का?

या सर्व प्रश्नापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकाने वाचावे "इकिगाई "

इकिगाई म्हणजे आवडती गोष्ट करण्याची स्फूर्ती व त्यापासून  मिळणारा आनंद ही व्याख्या बरोबर आहे.  इकिगाई हा मूळ शब्द जपानी.  मला मराठी पुस्तक वाचायला मिळाले हे माझे भाग्य आहे. इकिगाई या इंग्रजी पुस्तकाच्या उत्तम मराठी अनुवाद  करण्याचे आभार जातात ते प्रसाद ढापरे यांना,  की ज्यांनी हे उत्तम मराठी अनुवादित पुस्तक आम्हा मराठी रसिक वाचकांना उपलब्ध करून दिले.

"इकिगाई" मनाला चिरतरूण करते.
खरंखुरं आनंदी जीवन जगायला शिकवते. भरपूर अर्थार्जन केले की संपन्नता आली हा गोड गैरसमज आहे,  पण असे नाही, हे या पुस्तकातून शिकता आले.  अर्थार्जनाखेरीजही कला, कौशल्य,  वाचन,  स्वयंपाक,  गाणं,  भजन,  पर्यटन,  नातेवाईक भेटी, समाजकार्य, लेखन,  यासारखे अनेक छंद पूर्ण करायचे राहून गेलेले आहेत,  हे लक्षातच येत नाही.

खरे तर वय वर्षं 60 झाले,  मी थकले/थकलो हे म्हणणे अत्यंत भ्याडपणाचे लक्षण आहे, हे म्हणण्याचे धाडस येते हे पुस्तक वाचले की.  थकण्याचे हे वय नाहीच मुळी. उलट वयवर्षे 60 ते 70 हा काळ स्वतंत्र जगायचा. म्हणजे दिवसाच्या 24 तासांचे मालक तुम्हीच.  मुक्तछंदाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा काळ.

बांधीलकी, जबाबदाऱ्यांतून मुक्त होतोय याचा अर्थ असा नव्हे की, येथून पुढची दैनंदिनी आराम आराम आणि आरामच करायला पाहिजे.  मंडळी, माहित आहे ना, पंडित चाचा नेहरू  म्हणायचे "आराम हराम है !"  तेच तर करायचेय आरामाला टाटा, बाय बाय करून छंद व आरोग्य जोपासण्यासाठी वेळ कामी लावायचा हे शिकवले "इकिगाई" नी.आणि उमगले प्रत्येकाचा इकिगाई कशात ना कशात दडलेला आहे.

सतत खाणे, पोटभर जेवणे व टीव्ही मोबाईलमध्ये  सतत कोणत्या ना कोणत्या स्क्रीनच्या आधीन होणे ही न सुटणारी व्यसने आहेत.    फेसबुक,  व्हॉटसअँपवर स्क्रोलिंग होत राहणार आहे,  त्याला अंत नाही.  ते एक खेळणं म्हणून मनुष्य वापरतोय आणि मनुष्य कळसूत्री बाहुला झालाय हे कुठेतरी थांबायला हवय हे मनापासून वाटत इकिगाई वाचनानंतर.

पुस्तके सावलीसारखी पाठीशी असतात,  हे मनावर बिंबलय लहानपणापासून. ते आज इकिगाईनी सिध्द केलय.

भूकेपेक्षा कमी म्हणजे 100 ऐवजी 80 टक्के जेवण घेणे,  दैनंदिन व्यायाम-योगा व सतत कार्यमग्नता  ही त्रिसूत्री देणगी साठीनंतरचे निरोगी जीवन जगण्यासाठी मिळालीय इकिगाईतून.  इकिगाईमुळे एक मनुष्य नाही तर पूर्ण कुटुंब व पर्यायाने आपलाा देशही दीर्घायुषी होईल व सर्वाधिक निरोगी ज्येष्ठ  लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताची गणना होऊ शकेल.

आवडत्या माणसाच्या प्रेमात पडणे काय असते हे माहित होते,  पण आवडत्या पुस्तकाच्या प्रेमात पडणे काय असते याची अनुभूती मिळाली इकिगाईतून.  


येथील प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड काही ना काही कामात गुंतलेला असतो. बागकामापासून ते स्वयंपाक आणि इतर आवडीची कामे करण्यापासून ते वयाच्या ८८ व्या वर्षी driving करण्यापर्यंत. आहार पाहाल तर तो ही थक्क करणारा. आपल्याकडच्या सीनिअर सिटीझन ग्रुप्स मध्ये वय वर्षं ६० ते साधारण ९० पर्यंत वय असलेले नागरिक असतात. अगदीच कधीतरी ९५ च्या आसपास वय असलेले आजोबा किंवा आजी दिसतात. ओकिनावा मध्ये जो सीनिअर सिटीझन ग्रुप आहे त्यात वयाने सर्वात लहान सदस्याचं वय आहे ८३ आणि तिथून पुढे म्हणजे अगदी ११४ वयापर्यंत चे  'तरूण' लोकं. पोट तुडुंब भरेपर्यंत जेवणारे आणि तृप्तीची ढेकर देणारे आपण भारतीय असुदेत किंवा फास्ट फूड, जंक फूड ह्यांच्या संपूर्ण आहारी गेलेले ते अमेरिकन्स... आयुष्यभर इतकं मनसोक्त हवा तसा आहार असुन पण का वयाच्या चाळिशी नंतर तब्ब्येतीच्या एक एक तक्रारी आगंतुक पाहुण्यासारख्या येतात आपल्याकडे? का आपल्या देशांमध्ये आयुर्मानं कमी होत चालली आहेत? आणि तेच ओकिनावा मधील हे वयाची शंभरी ओलांडलेले पण मनाने कायम तरुण असलेले आजी आजोबा...

ह्या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तर आहेत हेक्टर गार्शिआ आणि फ्रान्सिस मिरेल्स लिखित इकिगाई ह्या पुस्तकात.

जपानमधील लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी अंगीकारलेली ही जीवनपद्धती केवळ थक्क करूनच नाही सोडत तर "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" ह्या आपल्या मातीत जन्मलेल्या ओळींचा खरा अर्थ त्या शेकडो मैल दूर राहणाऱ्या जापनीज लोकांनाच खऱ्या अर्थाने उमगलाय ह्याची अनुभूती येते.



"इकिगाई...."
जे करत आहोत ते आवडीने करण्यापेक्षा आवड शोधून ते आनंदाने करणे कधीही जास्त आनंददायी.

"इकिगाई" ही जपानी संकल्पना आहे. इकीगाई म्हणजे आपल्या असण्याचं कारण, रोज सकाळी उठण्याचं कारण किंवा प्रयोजन. माणूस जे जगतो त्या जीवनाचा अर्थ, पॅशन किंवा आवड, हेतू समजणं किंवा माणूस ज्यासाठी जगतो ते काहीतरी सापडणं म्हणजे इकिगाई. 'इकिगाई' नावाचं नक्की वाचावं असं सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकात दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जगण्याचं रहस्य सांगितलं आहे. सतत व्यस्त राहण्यामध्ये आनंद आहे असे हे पुस्तक सांगते.

"जपानी लोकांच्या मते प्रत्येकाच्या जीवनाचा एक इकिगाई असतोच, काहींना तो मिळालेला असतो तर काही त्याला शोधत असतात."

 छंद जोपासणे, हलका व्यायाम, कधीही निवृत्त न होणं, ८०% पोट भरेल एवढं जेवणं, सतत सूप पित राहणं,  मित्र मैत्रिणी, आप्त यांना वेळ देणं, सक्रिय शरीर आणि मन, तणाव न घेणं, थोडं अवघड काम करणं अशा असंख्य गोष्टी जपानी जीवन पद्धतीचा भाग आहेत.
"गरज नसतानाही सतत कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला तुमचा इकिगाई माहिती असणं आवश्यक असतं. तुमचा इकीगाई तुम्हाला सतत लोकोपयोगी आणि आकर्षक गोष्टी बनवण्यासाठी प्रेरणा देत राहतो."

बऱ्याचदा आपण कमावण्यासाठी आयुष्यभर काहीतरी करत राहतो, त्यामागे धावत राहतो. पण आपण जे करत असतो तोच आपला ईकिगाई आहे का, आपण तेच करतो आहोत का जे आपल्याला करायला मनापासून आवडते, हा प्रश्न आपण कधी स्वतःला विचारतो का(साधारणपणे वयाच्या तिशीनंतर हा प्रश्न पडायला लागतो ज्याला midlife crisis असे ही म्हणतात.)
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर थांबून आपला इकिगाई शोधायला हवा, शोधता येतो खरं तर. आपला इकीगाई समजण्यात, आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्याने, वेगळ्या नजरेने पाहण्यात हे पुस्तक काही अंशी का होईना नक्की मदत करेल.

हे मूळचे इंग्रजीत लिहिले गेले आहे. खरं तर अशी जीवन जगायला शिकवणारी आणि प्रेरणादायी वर्गवारीतील पुस्तके मी कधी वाचली नाहीत. पण याचे नाव ऐकले होते, म्हणून घेऊन वाचले, आवडले.

"आनंदी राहण्यात दीर्घायुष्य आहे.

Sunday, 19 March 2023

पुस्तक:"पाकिस्तान अथवाभारताची फाळणी" लेखक: डाॅ. बी. आर. आंबेडकर

पुस्तक:"पाकिस्तान अथवा भारताची फाळणी"
लेखक: डाॅ. बी. आर. आंबेडकर

  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1940 ला हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दृष्टा महापुरुष! तसेच ते अत्यंतिक राष्ट्रभक्त! त्यांनी आपले विचार भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मांडले.विरोध पत्करून कृती केली.जेंव्हा पाकिस्तान ची मागणी जोर धरत होती तेंव्हा हे  पुस्तक लिहिले.

 तत्कालीन परिस्थिती मुसलमान समाजाची मानसिकता , त्यांचा इतिहास , समाजातील स्त्रियांची स्थिती यावर परखड मत बाबासाहेब यांनी व्यक्त केले आहे . 

पृष्ठ:३३६ हार्ड कव्हर

मूल्य:४००
 
अनुक्रमणिका

● प्रस्तावना

भाग पहिला : पाकिस्तानकरता मुस्लिम जनतेची स्थिती.!

•भाग दुसरा : पाकिस्तानविरुध्द हिंदूंची विचारधारा

•भाग तिसरा : पाकिस्तानचा पर्याय.?

•भाग चौथा : पाकिस्तान ची संवेदना

•भाग पाचवा : पाकिस्तानच्या समस्या

•पुस्तक कसे आहे.? त्यातील एक पृष्ठ

लाला लजपतराय

लाला लजपतरायांनी सी.आर.दास यांना लिहिलेल्या पत्रात पुढील भीतीचा उल्लेख केलेला आढळतो...

 'दिवसापासून मला एका गोष्टीचे शल्य डिवचत आहे , त्यावर आपण जास्तीतजास्त सावधनपूर्वक विचार करू शकाल अशी मला आशा आहे . मी सहा महिनीच्यावर काळ मुस्लिम इतिहास आणि मुस्लिम कायद्याच्या अध्ययनात घालविला .त्यावरून हिंदू-मुस्लिम ऐक्य हे अशक्य व प्रयोगात आणण्यासारखे नाही अशी माझी स्पष्ट धारणा झालेली आहे ."

पुस्तकावर काही अधिक लिहिण्यापेक्षा हे पुस्तक वाचणे हेच चांगले.


पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे ...